यशपालजी
व्यासंगी, विद्वान नेतृत्व- यशपाल सरवदे यशपालजींची आणि माझी ओळख सर्वप्रथम मी आकाशवाणीत असतांना 1998 साली झाली. तो पर्यंत आंबेडकरांच्या विचारांवर नितांत प्रेम करणारे नेतृत्व एवढीच त्यांची माझ्या साठी ओळख होती. आकाशवाणी उस्मानाबाद साठी केल्याने देशाटन या मालिकेतील ' धाराशिव लेणी' या कार्यक्रमाच्या निर्मिती दरम्यान त्यांची नवीन ओळख मला झाली. ती ओळख एक व्यासंगी,बुद्धीवादी , साक्षेपी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ता अशी होती. बुद्ध विचार हा माझ्या आणि त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्यात त्यांचा डॉ.आंबेडकरांवरील अभ्यास आणि माझे जवाहरलाल नेहरू विषयक संशोधन यातून आमचा स्नेह वाढला. मी तेर वर पुस्तक लिहू लागलो तेव्हा आम्ही अतिशय जवळ आलो. आम्ही मिळून तेरला अनेक वेळा भेट दिली. सन 2001 साली तीर्थ (बु) या तुळजापुर जवळील गावाच्या भैरवनाथाच्या टेकडीवर एक प्राचीन स्थापत्य सापडले होते. ते बौद्ध स्तुप असल्याचे मत मांडणारा एक लेख मी दै.संघर्ष मधे लिहीला. तो वाचून त्यांनी मला आवर्जून फोन केला आणि सत्य सांगण्याचं धाडस केलंस म्हणून माझे कौतुकही केले. त्यानंतर आमचा एकत्र संशोधन प्रवास सुरू झाला. उस्मान